'हरीत भारत सायकल यात्रा' १५ ऑगस्टपासून सुरू होणार
पुणे: 'इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुप' यांच्या वतीने पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी 'हरीत भारत सायकल यात्रा' या अनोख्या मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा शुभारंभ १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयापासून होणार आहे. या यात्रेचे प्रमुख सायकलस्वार असलम इसाक बागवान हे असून, ते पुणे येथून सायकलद्वारे देशभरात पर्यावरणाचा संदेश घेऊन प्रवास करणार आहेत.
या सायकल यात्रेचा मार्ग पुणे-खोपोली-भिवंडी-तापी-सुरत असा सुरू होऊन गुजरात, राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर, लेह-लडाख, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, अंदमान, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि पुन्हा महाराष्ट्र असा असेल. असलम बागवान हे १५ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झालेला हा प्रवास १४ मे २०२६ पर्यंत पूर्ण करतील. या यात्रेचे मुख्य उद्दिष्ट पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे, वृक्षारोपण आणि हरित क्रांतीला चालना देणे, प्रदूषणमुक्त भारतासाठी जनजागृती करणे, आरोग्यदायी जीवनशैली व सायकल संस्कृतीचा प्रसार करणे तसेच समानता, एकता, बंधुता आणि विश्वशांतीचा संदेश पसरवणे हे आहे. या प्रवासादरम्यान देशभरात एक लाख वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
पुणेकर नागरिकांना या मोहिमेच्या प्रमुख प्रवाशाला शुभेच्छा देण्यासाठी १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ए. एस. के. हॉल, मिठानगर, कोंढवा खुर्द, पुणे येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुप'ने सर्व नागरिकांना या ऐतिहासिक उपक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
Environment, Social Initiative, Cycling, Pune, Green India
#HaritBharat #CycleYatra #Environment #GreenIndia #Pune #GoGreen #incredibleSamajsevakGroup

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: