मतदार याद्यांमध्ये घोळ होत असल्याचा राहुल गांधी यांचा पुनरुच्चार (VIDEO)

 


महाराष्ट्र आणि कर्नाटक निवडणूक आयोगाकडून आरोपांचे खंडन, पुरावे देण्याची मागणी

नवी दिल्ली, (प्रतिनिधी): काँग्रेसचे लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर मतदार याद्यांमध्ये 'घोळ' करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.  नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हा दावा केला.

राहुल गांधी म्हणाले की, "महाराष्ट्रामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान मतदारांची संख्या मुद्दाम वाढवण्यात आली, त्यामुळे विधानसभेत बनावट मतदान झाले." त्यांनी एक कोटी नवे मतदार वाढवण्यात आल्याचा दावा केला. तसेच, कर्नाटकातही बोगस मतदार असल्याचं त्यांनी म्हटलं.

त्यांनी आरोप केला की, निवडणूक आयोगाकडून वारंवार मागणी करूनही आम्हाला मतदार यादी किंवा डिजिटल आकडेवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे कागदावरच्या आकडेवारीतून हा घोळ जनतेसमोर मांडावा लागत आहे.

या आरोपांनंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक निवडणूक आयोगाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. आयोगाने म्हटले आहे की, जर त्यांच्याकडे असे पुरावे असतील, तर त्यांनी ते प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावेत.

  • Rahul Gandhi

  • Election Commission

  • Voter List Fraud

  • Maharashtra Elections

  • Karnataka Elections

#RahulGandhi #ElectionCommission #VoterFraud #Maharashtra #Karnataka #IndianPolitics #FakeVoters

मतदार याद्यांमध्ये घोळ होत असल्याचा राहुल गांधी यांचा पुनरुच्चार (VIDEO) मतदार याद्यांमध्ये घोळ होत असल्याचा राहुल गांधी यांचा पुनरुच्चार (VIDEO) Reviewed by ANN news network on ८/०९/२०२५ ०३:४३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".