या संदर्भात बोलताना आमदार गोरखे म्हणाले, "अहिल्यादेवी होळकर या केवळ एक राजमाता नव्हत्या, तर त्या एक आदर्श शासिका, समाज सुधारक आणि जनतेच्या हितासाठी कार्य करणाऱ्या महान स्त्री होत्या. त्यांच्या जीवनकार्याचे स्मरण करणे ही आजच्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे."
या जयंती वर्षानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रम, शैक्षणिक उपक्रम, महिला सक्षमीकरणासाठी विशेष मोहीम आणि त्यांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची सूचना आमदार गोरखे यांनी आयुक्तांना दिली आहे.
यावेळी बोलताना आमदार अमित गोरखे यांनी असेही नमूद केले की, शहरातील तरुण पिढीला अहिल्यादेवींच्या प्रेरणादायी कार्याची ओळख करून देण्यासाठी महापालिकेने विशेष प्रयत्न करावेत. यासाठी दरवर्षी दिला जाणारा १ लाख रुपयांचा निधी वाढवून यावर्षी ५० लाख रुपये करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
......................................
#AhilyadeviHolkar300
#AmitGorkhe
#PimpriChinchwad
#JayantiCelebration
#SocialReformer
#MaharashtraCulture
#FundsRequest
Reviewed by ANN news network
on
५/०८/२०२५ ०२:५०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: