देशाला सुरक्षित, समृद्ध बनविण्याची क्षमता नसलेल्या राहुल गांधी यांना सत्तेपासून दूर ठेवा! : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

 

धुळे येथील प्रचार सभेत आवाहन

 

मुंबई : गेल्या दहा वर्षांची यशस्वी कारकीर्द आणि पुढील पंचवीस वर्षांच्या देशाच्या प्रगतीचा स्पष्ट आलेख असलेल्या भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवून देशाची जनता देशाच्या समृद्धीचीविकासाची वाटचाल सुरू ठेवणार आहेअसा विश्वास केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते अमित शाह यांनी सोमवारी धुळे येथे व्यक्त केला. इंडी आघाडीराहुल गांधीशरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत श्री.शाह यांनी विरोधकांच्या तुष्टीकरण धोरणाचे वाभाडे काढले. धुळे मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी-महायुतीचे लोकसभा उमेदवार डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ झालेल्या प्रचंड जाहीर सभेत बोलताना श्री.शाह यांनी मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीचा संपूर्ण आलेखच जनतेसमोर मांडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससार्वजनिक बांधकाम मंत्री ( सार्वजनिक उपक्रम ) दादा भुसेज्येष्ठ नेते आ.जयकुमार रावलआ.राहुल आहेरमाजी महापौर नाना करपे आदी यावेळी उपस्थित होते.

देशाच्या दृष्टीने ही निवडणूक महत्वपूर्ण आहे. देश कोणाच्या हाती सुरक्षितसमृद्ध राहणार याचा निर्णय जनतेला करावयाचा आहे. एका बाजूला 12 लाख कोटींचे घोटाळे करणारे काँग्रेस व इंडी आघाडीआणि दुसऱ्या बाजूला आपल्या उभ्या कारकीर्दीत भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेले नरेंद्र मोदी यांच्यातील ही लढाई आहे. एका बाजूला थोडासा उन्हाळा वाढताच बँकाँकला पळणारे राहुल गांधी आहेततर 23 वर्षांत एकही सुट्टी न घेतादिवाळीत देखील सरहद्दीवर जवानांसोबत दिवाळी साजरी करत अखंडपणे देशसेवा करणारे पंतप्रधान मोदी आहेत. एका बाजूला चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेले राहुल गांधी आहेततर दुसरीकडे चहा विकणाऱ्या गरीबा घरी जन्मलेले नरेंद्र मोदी आहेत. या दोघांतून आपल्याला नेता निवडायचा आहेअसे श्री.शाह म्हणाले.

डॉ.भामरे यांना दिले जाणारे एक-एक मत नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मोलाचे ठरणार आहे. मोदींनी देशाला सुरक्षित बनविलेसमृद्ध बनविलेदेशाची प्रतिष्ठा जगात उंचावली आहे. अयोध्येत राम मंदिर निर्माण व्हायला हवे होतेपण काँग्रेसशरद पवार आणि इंडी आघाडीने 70 वर्षे राम मंदिरात अडथळेच आणले. मोदींनी पाच वर्षांतच राम मंदिराची न्यायालयीन लढाई जिंकलीमंदिर बांधलेआणि श्रीरामाची प्राणप्रतिष्ठाही केली. या समारंभाचे निमंत्रणही या आघाडीच्या नेत्यांनी झिडकारलेआणि बहिष्कार घातला. राहुल गांधीउद्धव ठाकरे यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारलेकारण या सोहळ्यास हजेरी लावली तर व्होट बँक नाराज होईलयाची त्यांना भीती होती. आम्हाला अशा मतपेढ्यांची भीती नाही. आमच्या सरकारने काशी विश्वनाथसोमनाथ मंदिरे आणि सर्व श्रद्धास्थळांचामंदिरांचा जिर्णोद्धार केला. याबरोबरच मोदी यांनी देशाला सुरक्षित बनविण्याचे काम केले आहे. काश्मीरमधील 370 कलम रद्द करून मोदी यांनी काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेतले. महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिकही काश्मीरसाठी प्राण देण्यासाठी सज्ज आहेयाची काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे यांना कल्पना नाही अशी खिल्ली देखील त्यांनी उडविली. लांगूलचालनाच्या राजकारणापायी काँग्रेस आणि इंडी आघाडीवाले कलम 370 ला वर्षानुवर्षे कवटाळून बसले होते. मोदी सरकारने हे कलम रद्द केलेनक्षलवाददहशतवाद नष्ट करून देशाला सुरक्षित बनविले. 80 कोटी गरीबांना मोफत धान्य देऊन त्यांच्या जीवनात आनंद आणून त्यांची जीवनशैली उंचावण्याचे काम  केले. इंदिरा गांधीपासून काँग्रेस केवळ गरीबी हटविण्याच्या घोषणाच करत होते. मोदी सरकारने घराघरांत गॅस दिलाज्येष्ठ नागरिकांसाठी पाच लाखांपर्यंतचे वैद्यकीय उपचार मोफत केलेकोविडकाळात लस निर्माण करून मोदींनी 130 कोटी लोकसंख्येला सुरक्षित केले. राजकारणात ज्यांचे लाँचिंग वीस वेळा फेल झालेते राहुल गांधी चंद्रावर यान कसे धाडणारदेशाला सुरक्षितसमृद्ध करू शकतील काअसा सवाल करूनहे तर केवळ कुटुंबाच्या विकासासाठी एकत्र आले आहेतअसा आरोपही त्यांनी केला.

राम मंदिरकलम 370तिहेरी तलाकयाबाबत उद्धव ठाकरेंना जनतेने सवाल केले पाहिजेत. ते यावर बोलणार नाहीतकारण ते काँग्रेसशऱद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. उद्धव ठाकरेंनी मतांच्या लालसेने दहशतवादी कसाबचे समर्थन करणाऱ्या लोकांसोबत जाणे पसंत केलेअसा आरोप त्यांनी केला. मोदी जेव्हा-जेव्हा देशहिताचे निर्णय घेताततेव्हा राहुल गांधी सवाल उपस्थित करतात. राहुल गांधींनी वीर सावरकरांना विरोध केलाइंडी आघाडीचे नेते सनातन धर्माचा विरोध करतातउद्धव ठाकरे यांना हे मान्य आहे काहे त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसमोर स्पष्ट करावेअसे आव्हानही त्यांनी दिले. देशाला सुरक्षितसमृद्ध बनविण्याची क्षमताही नसलेल्या राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवावे काअसा सवालही त्यांनी जनतेला उद्देशून केलातेव्हा श्रोत्यांनी एकमुखाने नकाराच्या घोषणा दिल्या. मोदी यांच्याकडे गेल्या दहा वर्षांच्या कामाचा हिशेब आहेआणि पुढच्या 25 वर्षांच्या कामाची आखणीदेखील आहे. मोदीजींना पंतप्रधान बनविणे म्हणजेपाकिस्तानला मुहतोड जबाब देणेदेशातील कोट्यवधी युवकांना जगासोबत जोडणेदेशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर नेऊन ठेवणे आहेअसेही ते म्हणाले.

दहा वर्षे सरकार असलेल्या युपीए सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसलीतर मोदी सरकारने  15 लाख कोटी दिले आहेत. महाराष्ट्रात भारताला पहिल्या क्रमांकाचे स्थान प्राप्त करून देण्याची कामगिरी देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारने बजावली आहेकेवळ भारतीय जनता पार्टीचे नेता नरेंद्र मोदी हेच देशाला आणि महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम करतीलअशी ग्वाही देतडॉ.भामरे यांना विजयी करण्याचे आवाहन श्री.शाह यांनी केले. भामरे यांना विजयी करातुमच्या मतदारसंघाला सर्व क्षेत्रांत आघाडीवर नेण्याचे काम नरेंद्र मोदी करतीलअसा विश्वासही शाह यांनी भाषणाच्या अखेरीस व्यक्त केला. धुळे जिल्ह्यात सहा महामार्गांचे काम वेगाने झाले आहेकेवळ धुळ्यात साडेतीन लाख घरांत नळाचे पाणी मोदीजींच्या संकल्पातून पोहोचलेरखडलेले अनेक सिंचन प्रकल्प सुमारे 2500 कोटी रुपये खर्चून धुळ्याची पाणी समस्या सोडविण्याचे काम देवेंद्र फडणवीस व डॉ.भामरे यांनी केले आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात चार हजार कोटींची योजना आखली असून आचारसंहिता संपताच शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम थेट जमा होईलअशी ग्वाही देखील शाह यांनी दिली.

देशाला सुरक्षित, समृद्ध बनविण्याची क्षमता नसलेल्या राहुल गांधी यांना सत्तेपासून दूर ठेवा! : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देशाला सुरक्षित, समृद्ध बनविण्याची क्षमता नसलेल्या राहुल गांधी यांना सत्तेपासून दूर ठेवा! : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह Reviewed by ANN news network on ५/१३/२०२४ ०५:२९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".