शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य; नवीन नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक – परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ
पुणे, ता. ६ जुलै २०२५: स्कूल बस आणि व्हॅनमधून होणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, यासंदर्भातील नवीन नियमावलीची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी वाहनचालक, शिक्षक, पालक आणि प्रशासनाने जागरूक राहिले पाहिजे, असे मत राज्याच्या परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले. पर्वती विधानसभा मतदारसंघातील दोन हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे विनामूल्य वाटप करताना आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाचे संयोजन माजी नगरसेवक महेश वाबळे आणि आनंद रिठे यांनी केले होते.
सुरक्षित वाहतुकीसाठी नियम अनिवार्य
मिसाळ म्हणाल्या, "विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी वाहनचालक आणि कर्मचाऱ्यांची दर आठवड्याला अल्कोहोल चाचणी, पोलिस पडताळणी, अपघात किंवा गुन्ह्याचा इतिहास तपासणी, वाहनांमध्ये जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम, सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा, पॅनिक बटन, अग्नी नियंत्रण स्प्रिंकलर आणि महिला अटेंडंट आदी बाबी अनिवार्य करण्यात आल्या आहेत." स्कूल बसचालकांनी या नियमावलीची जबाबदारीने अंमलबजावणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उचललेल्या या पावलांमुळे पालकवर्गात समाधान व्यक्त होत आहे. नवीन नियमांची अंमलबजावणी करून प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रवास सुरक्षित आणि चिंतामुक्त होईल, अशी अपेक्षा मिसाळ यांनी व्यक्त केली.
School Bus Safety, Student Transport, Madhuri Misal, Pune, Transport Department, Government Priority, Safety Regulations, School Supplies Distribution
#SchoolSafety #StudentTransport #MadhuriMisal #Pune #TransportRegulations #SchoolBus #ChildSafety #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: