प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि दिव्यांगांचे आधारस्तंभ असलेले बच्चू कडू हे शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग आणि इतर समाज घटकांच्या विविध मागण्यांसाठी अमरावती येथील गुरुकुंज मोझारी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीजवळ रविवार, ०८ जून २०२५ पासून अन्नत्याग आंदोलनास बसले आहेत. त्यांच्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी उरण तालुक्यातील दिव्यांग सामाजिक संघटना आणि दिव्यांग बांधवांतर्फे उरणमध्ये हा मूक मोर्चा काढण्यात आला.
तहसीलदार उद्धव कदम यांना निवेदन देताना उरणच्या दिव्यांग सामाजिक संघटनेच्या सदस्यांनी सांगितले की, उरण तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांचा बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाला पूर्ण पाठिंबा आहे. त्यांनी सरकार दरबारी आपली मागणी पोहोचवण्याचे आवाहन तहसीलदारांना केले. "सरकारने लवकरात लवकर बच्चू कडू साहेबांशी विविध मागण्यासंदर्भात चर्चा करावी," अशी त्यांची मागणी आहे.
"जर यापुढे सदर मागण्यांसंदर्भात अनुकूल चर्चा झाली नाही, तर उरण तालुक्यातील तमाम दिव्यांग बांधव उपोषणाला बसतील," असा इशाराही यावेळी देण्यात आला. "बच्चू कडू साहेब हे शेतकरी आणि दिव्यांगांसाठी अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत, त्यामुळे आम्ही सध्या मूक मोर्चा काढत आपल्यासमोर आलो आहोत," असे दिव्यांग बांधवांनी म्हटले. या संदर्भात तहसीलदार उद्धव कदम यांना निवेदनही देण्यात आले.
याप्रसंगी दिव्यांग सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य आणि उरण तालुक्यातील इतर सामाजिक संघटनेचे सदस्यही उपस्थित होते.
Bachchu Kadu, Fasting Protest, Divyang Movement, Uran Taluka, Silent March, Farmers Rights, Social Justice
#BachchuKadu #DivyangMovement #SilentMarch #Uran #FarmersRights #Protest #SocialJustice #Maharashtra #UranNews

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: