जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विशेषतः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ होणाऱ्या आंदोलनांमुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच १२ मे रोजी बौद्ध पौर्णिमेनिमित्त विविध ठिकाणी मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले असल्याने, प्रशासनाने या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.
प्रतिबंधात्मक आदेशांतील महत्त्वाच्या बाबी
प्रतिबंधात्मक आदेशानुसार खालील कृत्यांवर मनाई घालण्यात आली आहे:
- शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे, लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेऊन फिरणे.
- अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे.
- दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकण्याची साधने बरोबर घेऊन फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे.
- सभ्यता अगर नीती याविरुद्ध अशी किंवा शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे, सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे.
- इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे.
- सार्वजनिक रितीने घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे.
- पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे.
सूट असलेले कार्यक्रम
अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी बाबींना प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत.
परवानगीसाठी प्रक्रिया
प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणालाही मोर्चा, मिरवणूक तसेच सभा, निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
#RatnagiriNews
#ProhibitoryOrders
#Section37
#LawAndOrder
#BuddhaPurnima
#MumbaiGoaHighway
#MaharashtraPolice
#DistrictAdministration
#Konkan
Reviewed by ANN news network
on
५/०९/२०२५ ०२:२१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: