जम्मू : भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा युद्धाच्या छायेत आहे, असं धक्कादायक विधान पाकव्याप्त काश्मीरमधील कार्यकर्ते डॉ. अमजद अयुब मिर्झा यांनी केलं आहे. त्यांनी दावा केला आहे की, 600 पाकिस्तानी कमांडो जम्मू-काश्मीरमध्ये घुसले आहेत.
कारगीलप्रमाणे युद्धाची शक्यता
डॉ. मिर्झा यांच्या मते, पाकिस्तानचे एसएसजी (स्पेशल सर्व्हिसेस ग्रुप) कमांडो जम्मू-काश्मीरमध्ये घुसून भारतीय लष्कराच्या हद्दीत प्रवेश करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, मेजर जनरल अदिल रेहमानी यांच्या नेतृत्वाखालील ही तुकडी जम्मूच्या दिशेने हल्ला करण्याच्या तयारीत आहे.
1. Allegedly SSG General Officer Commanding (GOC) Maj General Adil Rehmani is conducting the attacks in Jammu region.
— Amjad Ayub Mirza (@AMirza86155555) July 27, 2024
2. one whole SSG battalion is said to have infiltrated that means at least 600 commandos are in Kupwara region and else where.
3. local jihadi sleeper cells… pic.twitter.com/ZI1yz63GdP
हे घुसखोरी पाकिस्तानी लष्कराच्या 600 कमांडोंद्वारे केली जात आहे.Reportedly, Pakistan's top army commanders are behind the recent attacks in Jammu region. It is no surprise the precision with which these attacks are taking place. It is an act of war and India needs to respond accordingly. Ab Nahi Sahega Hindustan. pic.twitter.com/ErxP8S9g32
— Shesh Paul Vaid (@spvaid) July 29, 2024
जिहादी स्लिपर सेल्सची मदत
कुपवाडा आणि इतर भागात पाकिस्तानी एसएसजी कमांडोंना मदत करण्यासाठी स्थानिक जिहादी स्लिपर सेल्स सक्रिय झाले आहेत. मिर्झा यांनी असा दावा केला आहे की, लेफ्टनंट कर्नल शाहीद सलीम जिंजूआ भारतीय हद्दीतून पाकिस्तानी सैनिकांचे नेतृत्व करत आहेत आणि भारतीय लष्कराच्या 15 कॉर्प्सचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहेत.
अधिक तुकड्यांची तयारी
मिर्झा यांच्या मते, मुझफराबादमध्ये एसएसजीच्या आणखी दोन तुकड्या सज्ज आहेत, ज्यांचा उद्देश भारतीय भूभागात घुसखोरी करणे आहे. त्यांनी सांगितले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये यापूर्वी 40 ते 60 दहशतवादी घुसले होते, परंतु आता 500 ते 600 सैनिकांची मोठी तुकडी घुसली आहे आणि भारतीय लष्करावर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे.
या दाव्यामुळे भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. भारतीय लष्कराने यावर काय उत्तर देणार आणि परिस्थिती कशी हाताळणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: