महाड : किल्ले रायगडावर ६ जून रोजी ३५० वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यासाठी जमलेल्या शिवप्रेमींची गर्दी अनावर झाल्याने जमावाला काबूत आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला असल्याचे वृत्त आहे.
या प्रकरणी असे समजते की; आज ३५० वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यासाठी रायगडावर किमान अडीच लाख शिवभक्त जमा झाले होते. गर्दी वाढली. त्यामुळे चेंगराचेंअगरी होऊ नयेव म्हणून पोलिसांनी प्रयत्न सुरू केले. परंतू गर्दी काबूत आणणे अशक्य झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.
सोहळ्यासाठी उपस्थित असलेले छत्रपती संभाजीराजेही शिवभक्तांना शिस्त पाळण्याच्या सूचना करत होते. परंतु तरीदेखील गर्दी ऐकत नव्हती. त्यामुळे रायगडावरून खाली उतरताना प्रवेशद्वारावरील गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले.
Reviewed by ANN news network
on
६/०६/२०२३ ०६:५९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: