मुंबईत वार्ताहरांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, माध्यमांतून ही माहिती मिळाल्यावर मी याबाबत महानगरपालिकांकडे विचारणा केली. त्यावेळी १९८८ साली जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार दरवर्षी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे महापालिकांकडून मला सांगण्यात आले. अगदी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता.
लोकांनी काय खावे हे ठरविण्यात सरकारला कोणताही रस नाही, असे स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले की, 'आमच्यासमोर अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे १९८८ सालच्या निर्णयावर आजच काही निर्णय घेतल्यासारखे वादंग निर्माण करण्याची काही आवश्यकता नाही. आपल्या देशाच्या संविधानाने प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे आमच्या सरकारवर विनाकारण आरोप करू नयेत.'
Maharashtra, Politics, Government, Devendra Fadnavis, Meat Ban, Controversy
#MaharashtraPolitics #DevendraFadnavis #MeatBan #Maharashtra #BJP #ShivSena #GovernmentDecision #IndependenceDay
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: