गुरुवार, २१ ऑगस्ट, २०२५

उरण-नेरूळ रेल्वे प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा; लवकरच फेऱ्यांची संख्या वाढणार

 

उरणचे आमदार महेश बालदी यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी भेट

प्रवाशांच्या सोयीसाठी दररोज ४० ऐवजी ५० फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय

प्रवाशांच्या इतर प्रश्नांवरही सविस्तर चर्चा; लवकरच अंमलबजावणी होणार

उरण, (प्रतिनिधी): उरण ते नेरूळ रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच फेऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांनी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर चर्चा केली.

या भेटीदरम्यान, सध्याच्या ४० फेऱ्यांऐवजी ५० फेऱ्या सुरू करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे उरण व नेरूळ परिसरातील प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक सुकर आणि वेळेवर होणार आहे. या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी होणार आहे.

आमदार महेश बालदी यांनी सांगितले की, या बैठकीत केवळ फेऱ्या वाढवण्याबाबतच नव्हे, तर स्टेशनवरील सुविधा, वेळापत्रकातील नियमितता आणि तांत्रिक अडचणींवरही सकारात्मक चर्चा झाली. या निर्णयामुळे स्थानिक प्रवाशांना दिलासा मिळणार असून, रेल्वे सेवेत लक्षणीय सुधारणा होईल.



  • Uran-Nerul Railway

  • Mahesh Baladi

  • Ashwini Vaishnaw

  • Train Services

  • Commuter News

#Uran #Nerul #IndianRailways #MaheshBaladi #AshwiniVaishnaw #MumbaiLocal

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा