समाजाला सकारात्मकता आणि प्रगतीची दिशा दाखवण्याचे ज्योतिर्विदांना आवाहन
जयश्री बेलसरे, पुष्पा शेवाळे आणि ज्ञानेश सोनार यांचा पुरस्काराने सन्मान
४३ वर्षांची परंपरा ही अतुलनीय गोष्ट – श्री. नाटेकर
पुणे, (प्रतिनिधी): भालचंद्र ज्योतिर्विद्यालयाने आयोजित केलेल्या ४३ व्या अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचा समारोप २२ ऑगस्ट रोजी पुण्यात झाला. या दोन दिवसीय अधिवेशनात देशभरातील नामवंत ज्योतिर्विद सहभागी झाले होते.
अधिवेशनाच्या समारोप सत्राचे अध्यक्षस्थान भूषवताना श्री. नाटेकर यांनी सांगितले की, "ज्योतिष हे एक उपयुक्त माध्यम असून, त्यातून सकारात्मकता आणि प्रगतीचे दिशादिग्दर्शन व्हावे." त्यांनी ज्योतिर्विदांना समाजाला समृद्ध करण्यासाठी कार्यरत राहण्याचे आणि आधुनिक माध्यमांचा वापर करण्याचे आवाहन केले.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, कै. शीलाताई पाचारणे स्मृती आदर्श ज्योतिष शिक्षिका पुरस्कार सौ. जयश्री बेलसरे यांना, ‘शिक्षक रत्न पुरस्कार’ सौ. पुष्पा शेवाळे यांना, तर ‘ग्रहांकित जीवनगौरव पुरस्कार’ चित्रकार ज्ञानेश सोनार यांना प्रदान करण्यात आला.
अधिवेशनाचा पहिला दिवस (२१ ऑगस्ट) उल्हास पाटकर यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार आणि विजय जकातदार दांपत्याला ‘चंद्रपुष्प पुरस्कार’ व रमेश पलंगे यांना ‘वास्तूमहर्षी पुरस्कार’ प्रदान करून गाजला. या दोन दिवसीय अधिवेशनात विविध चर्चासत्रे, मार्गदर्शन सत्रे आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
Astrology Convention
Pune
Jyotish Adhiveshan
Bhalchandra Jyotirvidyalaya
Awards Ceremony
#JyotishAdhiveshan #Astrology #Pune #Conference #Awards
Reviewed by ANN news network
on
८/२२/२०२५ ०४:२६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: