गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी निर्णयाचे केले स्वागत
सामूहिक सलोखा आणि सद्भावना राखण्याचे प्रशासनाचे आवाहन
धुळे, (प्रतिनिधी): येत्या २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत असल्याने, धुळे जिल्ह्यातील मुस्लिम समाजाने यंदा ईद-ए-मिलादची मिरवणूक ५ सप्टेंबरऐवजी ८ सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय धुळे जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आला, आणि त्याचे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते तसेच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वागत केले.
या बैठकीला प्रशासनाचे इतर अधिकारीही उपस्थित होते. जिल्हाधिकारी विसपुते यांनी यावेळी बोलताना सांगितले की, सर्व सण साजरे करताना सहानुभूती, सद्भावना आणि शांततेवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. उत्सव साजरा करताना धार्मिक पवित्रता राखणे आणि भावी पिढ्यांना योग्य मूल्यांची जाणीव करून देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
या निर्णयामुळे दोन्ही समाजात सलोखा आणि सौहार्दपूर्ण वातावरण राखण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
Dhule
Eid-e-Milad
Ganesh Utsav
Communal Harmony
Festival
#Dhule #EidEMilad #GaneshUtsav #CommunalHarmony #PeaceCommittee #Maharashtra
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: