इराण आणि आर्मेनिया सरकारचे भारताने मानले आभार; तेहरानमधील नागरिकांना दूतावासाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन
नवी दिल्ली: इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, इराणमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारताने सुरू केलेल्या 'ऑपरेशन सिंधू' अंतर्गत, आतापर्यंत ११० विद्यार्थी सुखरूप भारतात परतले आहेत. यामध्ये काश्मीरमधील ९० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नवी दिल्ली विमानतळावर परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
पहिल्या टप्प्यात या ११० विद्यार्थ्यांना इराणमधून आर्मेनियाची राजधानी येरेवान येथे आणण्यात आले. तिथून विशेष विमानाने ते भारतात परतले. संघर्षग्रस्त भागातून सुखरूप भारतात परतल्याचा आनंद व्यक्त करत या विद्यार्थ्यांनी भारत सरकारचे, विशेषतः परराष्ट्र मंत्रालयाचे आभार मानले.
या बचावकार्यात इराण आणि आर्मेनिया सरकारचे सहकार्य मिळाल्याबद्दल भारत त्यांचा ऋणी असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, इराणमधील इतर भारतीय नागरिकांना तेहरानमधील भारतीय दूतावासाच्या सतत संपर्कात राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
Operation Sindhu, Student Repatriation, Iran-Israel Conflict, Indian Diaspora, Foreign Ministry #OperationSindhu #IndianStudents #IranCrisis #MEA #SafeReturn #VandeBharatMission

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: