२० वर्षांचा वीजपुरवठा खंडित होण्याचा त्रास संपला; आमदारनिधीतून नवीन ट्रान्सफॉर्मर बसवले
पिंपरी-चिंचवड: प्रभाग क्रमांक १४ मधील काळभोर नगर आणि मोहन नगर परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार वीज खंडित होण्याच्या समस्येने त्रस्त होते. या समस्येवर आता कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आमदार अमित गोरखे यशस्वी ठरले आहेत.
आमदार निधीतून काळभोर नगर येथे ३१५ के.व्ही.ए. (KVA) क्षमतेच्या जुन्या ट्रान्सफॉर्मरच्या जागी ६३० के.व्ही.ए. क्षमतेचा नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. तसेच, मोहन नगरमध्ये देखील नवीन ३१५ के.व्ही.ए. क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला आहे. या दोन्ही उपाययोजनांमुळे संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा अधिक सक्षम आणि स्थिर होणार आहे.
यावेळी आमदार अमित गोरखे म्हणाले, "जनतेच्या भक्कम पाठिंब्यामुळेच मला काम करण्याची प्रेरणा मिळते. आपल्या भागातील कोणताही प्रश्न असो, तो सोडवण्यासाठी मी नेहमीच अग्रसर राहीन. नागरिकांनी त्यांच्या अडचणी माझ्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत, त्या अडचणींचा योग्य तोडगा काढण्याची आणि ते काम वेळेत मार्गी लावण्याची जबाबदारी मी स्वतः घेण्यास सदैव तयार आहे."
दिनांक ५ मे २०२५, गुरुवारी या दोन्ही ट्रान्सफॉर्मर्सचे लोकार्पण आमदार अमित गोरखे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी भाजपा जिल्हा प्रवक्ते राजाभाऊ दुर्गे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश लंगोटे, कैलास कुटे, तेजस्विनी दुर्गे, मनीषा शिंदे, विजय शिनकर, सचिन बंदी, नागेश वाघमोडे, देव दुर्गे, विष्णू कराळे, अनिल राऊत, नंदू भोगले, चंद्रकांत शिंदे, जनार्दन तलारे, अविनाश गावडे, दिलीप दातीर यांसह अनेक मान्यवर आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
या उपक्रमामुळे काळभोर नगर आणि मोहन नगर भागातील पुढील २० वर्षांसाठी विजेची समस्या मिटणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
#PimpriChinchwad #ElectricityProblem #KalbhorNagar #MohanNagar #AmitGorkhe #Infrastructure #Development #BJP #Pune

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: