सावत्र भावाच्या हत्येप्रकरणी आरोपी जेरबंद

 


ठाणे: कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नालिंबी गावात एका अनोळखी व्यक्तीचा खून करून त्याचे शिर धडापासून वेगळे करून पुरावा नष्ट केल्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीणच्या पथकाने एका आरोपीला अटक केली आहे. दिनांक २० जून २०२५ रोजी या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २९ मे २०२५ रोजी सकाळी ०९:०० वाजण्यापूर्वी नालिंबी गावच्या हद्दीतील नालिंबी ते अंबरनाथ बाजुकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला असलेल्या जंगल भागात एका अनोळखी पुरुष जातीच्या व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. अज्ञात कारणावरून अज्ञात इसमाने या व्यक्तीचे मुंडके धडापासून वेगळे करून, सदर मुंडके कोठेतरी घेऊन जाऊन जिवे ठार मारून प्रेत टाकून दिले होते. याबाबत पोलीस पाटील सौ. संगीता संतोष शिंदे (रा. आणेपाडा, आणेगाव, ता. कल्याण, जि. ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक २८२/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), २३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य पाहून  डॉ. डी. एस. स्वामी, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण, आणि  भारत तांगडे, अपर  अधीक्षक, ठाणे ग्रामीण, यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश व मार्गदर्शन केले. त्यानुसार, सुरेश मनोरे, वरीष्ठ निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, ठाणे ग्रामीण यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन केले.

या सर्व पथकांनी अहोरात्र परिश्रम घेऊन तपास सुरू केला. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तसेच, महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमधील बेपत्ता व्यक्तींची माहिती मिळवून, अनोळखी मृतदेहाचे फोटोचे बॅनर (स्टिकर) बनवून ते ठिकठिकाणी चिकटवण्यात आले. राज्यातील विविध व्हॉट्सअॅप ग्रुपवरही अनोळखी मृतदेहाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली. याच दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे  उपनिरीक्षक महेश कदम आणि त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, गुन्ह्याच्या घटनास्थळाच्या परिसरात एक संशयित कार दिसली होती.

सदर कारबाबत अधिक तपास केला असता, ती कार सलमान महंमद गौरी अन्सारी (वय २५, रा. अनस चाळ, चाळ नं. , मांडा, टिटवाळा, जि. ठाणे) याची असल्याचे समजले. सलमान महंमद गौरी अन्सारी याला ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने  विचारपूस केली असता, त्याने कबूल केले की, मृत व्यक्ती हा त्याचा सावत्र भाऊ फैसल महंमद गौरी अन्सारी (वय २९, रा. अनस चाळ, चाळ नं. , मांडा, टिटवाळा, जि. ठाणे) होता. त्यांच्यात आपसात सतत भांडणे होत होती आणि प्रॉपर्टीवरूनही वाद होता. याच वादामुळे त्याने सावत्र भाऊ फैसल महंमद गौरी अन्सारीचा खून केल्याची कबुली दिली.

आरोपी सलमान महंमद गौरी अन्सारी याला पुढील तपासकामी कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास  निरीक्षक  बाळा कुंभार करीत आहेत.

Murder Case, Arrest, Thane Rural Police, Kalyan, Property Dispute, Crime Investigation. 

 #ThanePolice #MurderMystery #KalyanCrime #PoliceInvestigation #PropertyDispute #JusticeServed

सावत्र भावाच्या हत्येप्रकरणी आरोपी जेरबंद सावत्र भावाच्या हत्येप्रकरणी आरोपी जेरबंद Reviewed by ANN news network on ६/२३/२०२५ ११:०९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".