खेड/वेरळ: खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या (सीबीएसई) दोन विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठित जेईई अॅडव्हान्स परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले आहे. इयत्ता बारावी विज्ञान शाखेतील निखिल सिंग आणि गुरु तटकरी या दोघांचीही या परीक्षेत अव्वल स्थान पटकावल्याने आयआयटी (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) साठी निवड झाली आहे.
या परीक्षेत निखिल सिंग याने कोकण विभागात द्वितीय क्रमांक पटकावला, तर गुरु तटकरी याने तृतीय क्रमांक मिळवत महाविद्यालयाच्या आणि तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयातील प्राध्यापक विनोद कुमार, नागेंद्र सिंग, आदर्श गौरव, दिब्यांग सिंग, राजेश सिंग आणि छोटू गुप्ता यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाला दिले आहे.
या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठानचे संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा सुप्रिया पाष्टे, शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. अली आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
----------------------------------------------------------------------------------------------
#JEEAdvanced #IIT #SamarthKrupaVidyalaya #Veral #Khed #KonkanToppers #StudentSuccess #EducationIndia #NikhilSingh #GuruTatkari #CBSE #IITJEE #EngineeringEntrance #MaharashtraEducation

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: