कळंबुसरेतील वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार महेश बालदींकडून पाहणी; तातडीची आर्थिक मदत
उरण, दि. २६ : उरण तालुक्यातील कळंबुसरे गावात २५ मे २०२५ रोजी झालेल्या वादळी पावसामुळे अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार महेश बालदी यांनी आज प्रत्यक्ष गावात भेट दिली.
आमदार बालदी यांनी नुकसानीची पाहणी करून काही गरजू नागरिकांना तातडीची आर्थिक मदत दिली. तसेच, या आपत्तीतून गावाला पुन्हा उभे करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. उरणचे तहसीलदार उद्धव कदम आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. "मी प्रशासनाच्या संपर्कात असून उरणवासीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. या आपत्तीच्या काळात कोणीही एकटे नाही," असे मत आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केले.
यावेळी तहसीलदार उद्धव कदम, कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
-------------------------------------------------------------------------------------------
#UranStorm #RaigadRains #MLAMaheshBaldi #DisasterRelief #Kalamusare #MaharashtraWeather #GovernmentAid #StormDamage

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: