हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता, पण अपूर्ण आश्वासनांमुळे अडचणीत सरकार : जयराम ठाकूर

हिमाचल आणि कर्नाटकातील अनुभव महाराष्ट्रात नको

पुणे (प्रतिनिधी) - काँग्रेस सरकारने हिमाचल प्रदेशात जनतेला आश्वासन देऊन सत्ता मिळवली, पण मागील दोन वर्षांत कोणत्याही आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नाही. काँग्रेसच्या दहा प्रमुख आश्वासनांचा जाहीरनामा खोटा ठरल्याने जनतेला विश्वासघाताचा अनुभव मिळाला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही, पेन्शन देखील दिली जात नाही, अशा स्थितीमुळे प्रशासनात नाराजी आहे. सत्ता काँग्रेसने मिळवली खरी, पण सत्ता चालवणे त्यांच्यासाठी अवघड झाले आहे, असे हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते जयराम ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यावेळी कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री डॉ. अश्वत्थ नारायण, कर्नाटकचे माजी मंत्री नारायण गौडा, भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि तेलंगणाच्या खासदार डी. के. अरुणा, भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर, कुणाल टिळक, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले उपस्थित होते.

हिमाचल प्रदेशातील स्थितीबाबत जयराम ठाकूर यांचे वक्तव्य

ठाकूर यांनी सांगितले की, हिमाचल प्रदेशला 'देवभूमी' म्हणून ओळखले जाते. काँग्रेसने निवडणूक काळात प्रत्येक महिलेस दर महिना ₹१५०० देण्याचे, पाच लाख युवकांना रोजगार देण्याचे, एक लाख सरकारी पदे भरण्याचे, प्रत्येक महिन्याला ३०० युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कोणत्याही आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्याने जनतेत असंतोष पसरला आहे. यामुळे महाराष्ट्रात अशी स्थिती निर्माण होऊ नये, असे आमचे प्रयत्न आहेत आणि जनतेने काँग्रेसचा खरा चेहरा ओळखावा, असे त्यांनी सांगितले.

कर्नाटकात काँग्रेसमुळे आर्थिक स्थिती बिघडली

कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री डॉ. अश्वत्थ नारायण यांनी सांगितले की, महाराष्ट्रात निवडणुका होणार आहेत आणि काँग्रेसने पुन्हा एकदा आश्वासनांची खैरात केली आहे. कर्नाटकात मागील १८ महिन्यांपासून काँग्रेस सरकार सत्तेत आहे, ज्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती बिघडली आहे. भ्रष्टाचाराच्या अनेक घोटाळ्यांची प्रकरणे समोर आली आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावरही गैरव्यवहारांचे आरोप आहेत आणि त्यांच्यावर न्यायालयात गंभीर गुन्हे दाखल आहेत. तेलंगणातील निवडणुकीसाठी कर्नाटक सरकारने बेकायदेशीररित्या ८७ कोटी रुपये हस्तांतरित केले असल्याचे उघडकीस आले आहे. काँग्रेसने भ्रष्टाचारात बुडाल्याचे स्पष्ट आहे, आणि महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी कर्नाटकातील निधी वापरला जात असल्याचा आरोप आहे.

तेलंगणात महालक्ष्मी योजनेस काँग्रेसकडून हरताळ

खासदार डी. के. अरुणा यांनी सांगितले की, तेलंगणा विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने सहा गॅरंटी दिल्या होत्या. शेतकऱ्यांना ₹२ लाख कर्जमाफी, शेतकरी आणि कामगारांना आर्थिक सहाय्य, महिलांना दर महिना ₹२५०० देण्याचे वचन, तरूणींना इलेक्ट्रिक दुचाकी, बेरोजगारांना भत्ता या सगळ्या आश्वासनांची पूर्तता अद्याप केली गेली नाही. सरकार स्थापन झाल्यापासून ११ महिने उलटले, तरी कोणतेही आश्वासन पूर्ण न झाल्याने जनतेत नाराजी आहे. मुख्यमंत्री दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन आश्वासने पूर्ण केल्याचे खोटे दावे करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसच्या अपूर्ण आश्वासनांमुळे हिमाचल, कर्नाटक आणि तेलंगणातील लोकांच्या अपेक्षांना धक्का बसला आहे, आणि जनतेला काँग्रेसच्या राजकीय धोरणांबद्दल गंभीर विचार करायला लावले आहे.

हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता, पण अपूर्ण आश्वासनांमुळे अडचणीत सरकार : जयराम ठाकूर हिमाचलमध्ये काँग्रेसची सत्ता, पण अपूर्ण आश्वासनांमुळे अडचणीत सरकार : जयराम ठाकूर Reviewed by ANN news network on ११/१४/२०२४ ०७:१४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".