पुणे (प्रतिनिधी) - केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी म्हटले की, राज्य सरकारने उचललेल्या पावलांमुळे महाराष्ट्रात सर्वाधिक परकीय गुंतवणूक येत असून अनेक उद्योग आकर्षित होत आहेत. पुणे हे देशातील सर्वाधिक आवडते औद्योगिक गुंतवणुकीचे ठिकाण आहे आणि येथील औद्योगिक क्षेत्रात शांतता राहण्याची आवश्यकता आहे.
विरोधी पक्षाला समजत नसल्याचे गोयल म्हणाले की, देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक होत आहे आणि रोजगार निर्मिती होत आहे. खासगी क्षेत्र सर्वाधिक रोजगार निर्मिती करत आहे, हा विषय काँग्रेस युवराज यांना समजत नाही. जगातील सर्वाधिक वेगाने विकसित होणारा भारत देश असून आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करत आहे, असेही ते म्हणाले.
गोयल यांनी नमूद केले की, मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात नागरिकांचा महायुतीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार अर्थव्यवस्था मजबूत करत आहे, जागतिक सन्मान वाढत आहे आणि परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येत आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकार देखील विकासाच्या गतीस चालना देत आहे.
गोयल यांनी आघाडी काळात विकासाची गती मंदावल्याचे नमूद केले आणि उद्धव ठाकरे यांच्या काळातील कारभार पाहून जनता पुन्हा त्यांचे सरकार नको असे म्हणत असल्याचे सांगितले. मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात देश विकासाकडे गतीने वाटचाल करत असल्याने उद्योगांना सुरक्षित वातावरण निर्माण झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.
Reviewed by ANN news network
on
११/१३/२०२४ ०९:१४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: