रत्नागिरी: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी २६३-दापोली मतदारसंघातून एकूण ९ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), बहुजन समाज पार्टी यांसारख्या प्रमुख पक्षांचे उमेदवार तसेच पाच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात कदम आडनावाच्या पाच उमेदवारांनी निवडणुकीत उभे राहून लक्षवेधी स्पर्धा निर्माण केली आहे.
अबगुल संतोष सोनू (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), कदम योगेशदादा रामदास (शिवसेना), कदम संजय वसंत (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), मर्चंडे प्रविण सहदेव (बहुजन समाज पार्टी) हे प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार आहेत.
पाच अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कदम योगेश रामदास - बदलापूर, ठाणे येथील रहिवासी असून त्यांना "हिरा" चिन्ह देण्यात आले आहे. कदम योगेश विठ्ठल - नांदिवली, खेड येथील रहिवासी आहेत. त्यांना "विजेचा खांब" चिन्ह देण्यात आले आहे. कदम संजय सिताराम - हुंबरी खालची, खेड येथील असून यांना "चिमणी" चिन्ह देण्यात आले आहे. कदम संजय संभाजी - नांदीवली, केळेवाडी, खेड येथील रहिवासी आहेत. त्यांना "शिट्टी" हे चिन्ह देण्यात आले आहे. खांबे ज्ञानदेव रामचंद्र - टाकवली, मंडणगड येथील आहेत. त्यांना "बासरी" हे चिन्ह देण्यात आले आहे.
खरी लढत शिवसेनेचे योगेश कदम आणि शिवसेना उबाठा गटाचे संजय कदम यांच्यातच होणार आहे. या मतदार संधात सुमारे १५००० मते भाजपची मते आहेत. ती योगेश कदम यांना मिळणार की तटस्थ राहणार या प्रश्नाच्या उत्तरात विजयाचे गणित दडलेले आहे.
Reviewed by ANN news network
on
११/०४/२०२४ ०५:४८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: