ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कर्नाटकी कट हाणून पाडा; कोल्हापूर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

 



कोल्हापूर : कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने मुस्लिमांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट केले आणि ओबीसी समाजाचे संपूर्ण आरक्षण काढून घेऊन रातोरात मुस्लिमांना वाटून टाकलेआता हाच फॉर्म्युला देशभर राबविण्याचा काँग्रेसचा कट आहेअसा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी कोल्हापूर येथे जाहीर सभेत बोलताना केला. कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या महाविजय संकल्प सभेत ते बोलत होते.छत्रपती शिवाजी महाराजधर्मवीर संभाजी महाराजराजर्षि शाहू महाराज यांची पवित्र भूमी असलेल्या करवीर नगरीला व कोल्हापूरवासीयांना प्रणाम करून मोदी यांनी आपल्या भाषणाचा प्रारंभ केला. त्याआधी अबकी बारचारसो पार अशा घोषणा देत आणि जय श्रीरामाचा जयघोष करत कोल्हापूरकरांनी मोदी यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांना सन्मानाचा कोल्हापुरी फेटा बांधलामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महालक्ष्मीची प्रतिमा दिलीसंजय मंडलिक यांनी कोल्हापूरचा सेंद्रीय गूळ देऊन तर धैर्यशील माने यांनी संत बाळुमामांची मूर्ती देऊन पंतप्रधानांचे स्वागत केले.आपल्या तडाखेबंद भाषणात पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसइंडी आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या उबाठा गटावर जोरदार हल्ला केला. श्री. मोदी म्हणाले कीमतदानाच्या दुसऱ्या टप्प्यानंतर भाजपा आणि एनडीए दोन विरुद्ध शून्य गुणांनी आघाडी घेतली आहे. इंडी आघाडीने द्वेषाच्या राजकारणामुळे सेल्फ गोल करून घेतला आहे. त्यामुळे आता फिर एक बारगरीबो की सरकारएसटीएसटी ओबीसी सरकारयुवाविकासमहिलाशेतकऱ्यांचे सरकारफिर एक बार... अशी घोषणा देत मोदी यांनी महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले.



कोल्हापूरकर असा गोल करतीलकी ज्यामुळे पुढचे सारे टप्पे इंडी आघाडीवाले पूर्ण चीत होतीलअसा विश्वास व्यक्त करूनजगात भारी कोल्हापुरी अशी घोषणाही मोदी यांनी दिली.विकसित भारताच्या संकल्पाची ही निवडणूक आहेपण विकासाच्या मुद्द्यावर आपण एनडीएची बरोबरी करू शकत नाही याची जाणीव जेव्हा काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना झालीतेव्हा त्यांनी आपली रणनीती बदललीआणि देशविरोधी अजेंडा व तुष्टीकरणाचा वापर सुरू केला. आता सत्तेवर आल्यावर कलम 370 पुन्हा आणण्याचा काँग्रेसचा अजेंडा आहेपण काँग्रेसचा हा मनसुबा जनता हाणून पाडेलसीएए कायदा रद्द करण्याचा प्रयत्न केलाचतर त्यांची हालत काय होईल हे त्यांना माहीत नाही. ज्यांना तीन अंकी आकडा गाठता येणार नाहीते सत्तेच्या दरवाजापर्यंत तरी पोहोचतील काअसा सवालही त्यांनी केला. आता ‘एक साल एक पीएम’ हा फॉर्म्युला बनवायला ते निघालेतपाच वर्षांत पाच पंतप्रधानअसा खेळ खेळायची आखणी ते करत आहेतपण हा फॉर्मुला बनवणाऱ्यांना देश कधीच सहन करणार नाही याची जाणीव झाल्यामुळेआता ते देशावर राग काढत आहेत. दक्षिण भारताला तोडून अलग देश करण्याची मागणी ते करत आहेत. ‘अहत पेशावरतहत तंजावर हिंदवी स्वराज्य’ ही घोषणा ज्या भूमीत झालीती छत्रपती शिवाजी महाराजांची भूमीकाँग्रेसच्या अशा अजेंड्याला मान्यता देणार नाहीअसा इशाराही त्यांनी दिला. तसे करायला गेलेतर त्यांना जनता चोख उत्तर देईलअसेही ते म्हणाले.

अयोध्येतील राम मंदिराचे पाचशे वर्षांचे स्वप्न पूर्ण झालेपण दशकानुदशके राम मंदिरास विरोध करणाऱ्या काँग्रेसने त्यावरही बहिष्कार टाकला. प्रभू रामाच्या दरबाराचे निमंत्रण धुडकावणाऱ्यांना कधी माफ केले जाऊ शकत नाहीअसेही ते म्हणाले. जो राम को ठुकरायेगाउसको जनता ठुकरायेगीअसा इशारा त्यांनी दिला. जे नेते सनातनला डेंग्यू म्हणालेसनातनच्या विनाशाची भाषा करू लागलेत्या डीएमकेच्या नेत्यांना महाराष्ट्रात बोलावून त्यांचा सत्कार करणाऱ्यांना पाहून बाळासाहेब ठाकरेंना किती दुःख वाटले असेलअसा सवाल करून त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. नकली शिवसेनेचे हे नेते आता अशा लोकांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेतयामुळे बाळासाहेबांच्या आत्म्याला वेदना होत असतीलअसे ते म्हणाले.

लांगूलचालन व वोट बँकेचे राजकारण करणाऱ्या काँग्रेस आघाडीची नजर आता लोकांची कमाई व दलितमागासवर्गीयांच्या संपत्तीवर पडली आहे. या देशाच्या साधनसंपत्तीवर ज्यांचा पहिला हक्क आहे असे काँग्रेस मानतेत्यांना तुमची कमाई काढून घेऊन वाटण्याचा काँग्रेसचा कट आहेअसा इशारा त्यांनी दिला.

संपत्तीचा संपूर्ण हिस्सा वारसांना मिळू नये यासाठी वारसा कर लादण्याचे काँग्रेसचे स्वप्न जनता सफल होऊ देणार नाही. महाराष्ट्राची ही भूमी सामाजिक न्यायाचे प्रतीक आहे. पण काँग्रेस व इंडी आघाडीने सामाजिक न्याय पायदळी तुडविला. दलितआदिवासीएससी, एसटी, ओबीसी कोट्यातील आरक्षण काढून घेऊन मुसलमानांना देण्यासाठी काँग्रेसने कर्नाटकात रातोरात सर्व मुस्लिमांना ओबीसी ठरविलेआणि ओबीसींचे सारे आरक्षण मुसलमानांना मिळाले. हा कर्नाटक फॉर्म्युला संपूर्ण देशात राबविण्याचा कट काँग्रेसने आखला आहे. याआधीही संविधान बदलून आरक्षणावर डल्ला मारण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला होतापण तो यशस्वी होऊ दिला गेला नाही. ज्यांनी कर्नाटकात वंचितांच्या आरक्षणावर डल्ला मारलात्यांना देशात थारा मिळता कामा नयेअसा इशाराही मोदी यांनी दिला. एनडीएने आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातूनस्टार्टअप इंडियामधून देशातील जनतेसमोर संधींची द्वारे खुली केलीज्या युवकांना काँग्रेसने रोजगार आणि नोकऱ्यांसाठी वणवण करायला लावलीतो युवक आता यशस्वी व आत्मनिर्भर होऊन जगाच्या पाठीवर अभिमानाने मिरवत आहेअसा दावाही त्यांनी केला. येत्या पाच वर्षांत विकासाच्या प्रत्येक टप्प्यातील यशाचा वाटा जनतेला मिळेल ही मोदी की गॅरंटी आहेअशी ग्वाही त्यांनी दिली.

कोल्हापूरच्या विकासासाठी मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत अनेक योजना राबविल्या. याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण करणारे लोक महाराष्ट्राचा विकास करतील काअसा सवाल करूनयेत्या 7 तारखेला कोल्हापूर व हातकणंगले येथे संजय मंडलिक व धैर्यशील माने यांना विजयी करून मोदींचे हात बळकट कराअसे आवाहनही त्यांनी केले. कारण त्यांना दिले जाणारे प्रत्येक मत मोदींना मिळेलअसे ते म्हणाले. तुमची स्वप्ने हाच माझा संकल्प आहेआणि माझ्या जीवनाचा क्षण क्षण जनतेसाठी व देशसेवेसाठी समर्पित आहेअसे सांगून पंतप्रधानांनी कोल्हापूरच्या जनतेस विनम्र प्रणाम करून भाषणाची सांगता केलीतेव्हा पुन्हा एकदा मोदी विजयाच्या उत्स्फूर्त घोषणांनी कोल्हापूर दुमदुमून गेले.

 

ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कर्नाटकी कट हाणून पाडा; कोल्हापूर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कर्नाटकी कट हाणून पाडा; कोल्हापूर येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन Reviewed by ANN news network on ४/२७/२०२४ ०९:२४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".