रत्नागिरी : फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 नुसार दि. 18 मार्च 00.01 वाजता पासून ते दि. 16 मे चे 24.00 वा.पर्यतच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने सर्व नियोजित कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पडावेत, मतदान शंततेने व सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी आणि कोणताही उपद्रव किंवा अडथळा न होता मतदारांना आपला अधिकार बजावण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळावे, मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भयतेने बजावता यावा, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मनाई आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) अन्वये जिल्हादंडाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आज दिले.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची आचार संहिता दि. 16/03/2024 रोजी पासून लागू झालेली आहे. 46 रत्नागिरी-सिंधुदुर्ग व 32 रायगड रत्नागिरी, लोकसभा मतदार संघात दि. 07/05/2024 रोजी मतदान होणार असून, लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीची दि. 04 जूनरोजी मतमोजणी होणार आहे. आचार संहिता निवडणूक निकाल जाहीर होईपर्यत अंमलात राहणार आहे. निवडणूक खुल्या व निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी तसेच मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे बजावता येणे आवश्यक आहे. निवडणूक कालावधीत राजकीय पक्षाचे पुरस्कृत उमेदवार प्रभागामध्ये पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी पत्राव्दारे, प्रत्यक्ष संपर्क साधन जास्तीत जास्त मतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करीत असतात. त्याृष्टीने राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुरुवात झाली आहे. सर्व राजकीय पक्षांनी आप आपली मोर्चे बांधणी सुरु केलेती असून, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणे, वर्तमान पत्रांमध्ये वारंवार एकमेकांविरुध्द टीका टिपणी करणे, सोशल मीडीयावर एकमेकांविरोधात माहिती प्रसारित करणे वगैरे कारणांवरुन राजकीय पक्षामधील किरकोळ स्वरूपाच्या वादाचे, आरोप प्रत्यारोपांचे एखाद्या घटनेत होवून तणाव निर्माण होवून त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच उमेदवारांना मतदारांना घातक हत्यारांनी धाक धपटशा दाखविणे, तसेच प्रचारा दरम्यान क्षेपके किंवा प्राणघातक हत्यारे., बंदुका वापरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी क्षेपके किंवा प्राणघातक हत्यारे, बंदुका (शस्त्र) बाळगणेस व बरोबर घेवून फिरणेस बंदी जारी करणे जरुरीचे आहे. तरी जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने सर्व नियोजित कार्यक्रम शांततेत व सुरळीत पार पाडावेत, मतदान शांततेत व व्यवस्थीतपणे पार पाडण्यासाठी आणि कोणताही उपद्रव किंवा अडथळा न होता मतदारांना आपला अधिकार बजावण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळावे, मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भयतेने बजावता यावा यासाठी सर्व परवानाधारकांना शस्त्र बाळगणेस व बरोवर घेवून फिरणेस., जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राखण्यासाठी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घड़ नये म्हणून रत्नागिरी जिल्ह्यात संपूर्ण भू भागात फौजदार प्रक्रिया संहिता कायदा 1973 चे कलम 144 प्रमाणे दि. 18/03/2024 रोजी 00.01 ते दि. 16/05/2024 रोजी 24.00 वा पर्यत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
Reviewed by ANN news network
on
३/१९/२०२४ ०८:१२:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: