सोमवारपासून ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव, आमदार शशिकांत शिंदे आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांचे आमरण उपोषण!
मागे घेण्यासाठी माथाडी कायदा बचाव कृती समिती आक्रमक
आझाद मैदान येथे आमरण उपोषणाला बसणार!
मुंबई : ज्येष्ठ कामगारनेता डॉ. बाबा आढाव वयाच्या ९४ व्या वर्षी माथाडी कामगारांच्या प्रश्नासाठी उद्या २६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९ वाजता मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणास बसणार आहेत.त्यांच्यासोबत आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार नरेंद्र पाटील आणि प्रमुख माथाडी कामगार संघटनांचे नेतेही उपोषणात सहभागी होणार आहेत.
माथाडी कायद्यात सुधारणा सुचविणारे विधेयक क्रमांक ३४ आणि शासनाच्या पणन विभागाने १६ जानेवारी २०२४ रोजी काढलेले परिपत्रक मागे घ्यावे अशी या आंदोलकांची मागणी आहे.
विधेयक आणि परिपत्रकामुळे ८० टक्के माथाडी कामगार बेरोजगार होतील अशी भीती आंदोलकांना वाटत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपमख्यमंत्री गृह व वित्त, कामगार मंत्री, कामगार, पणन, गृह विभागाचे अधिकारी यांची माथाडी कायदा बचाव कृती समितीबरोबर संयुक्त बैठक आयोजित करावी अशी मागणी आंदोलक करत आहेत.
यासाठी माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कृतीसमिती स्थापन करण्यात आली असून त्यात आमदार शशिकांत शिंदे, आमदार भाई जगताप, गुलाबराव जगताप, बळवंतराव पवार, अविनाश रामिष्टे, अरुण रांजणे, शिवाजी सुर्वे, निवृत्ती धुमाळ, नंदाताई भोसले, लक्ष्मणराव भोसले, दत्ता घंगाळे, सतीशराव जाधव आदी नेत्यांचा समावेश आहे.
माथाडी अधिनियम१९६९ सुधारणा विधेयक क्र.३४ मागे घेऊन या अधिनियमातील तरतुदीनुसार महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजिवी कामगार सल्लागार समितीची व विविध माथाडी मंडळांच्या पुनर्रचना करुन अनुभवी कामगारनेत्यांची सदस्य म्हणून नेमणूक करावी, विविध माथाडी मंडळात माथाडी कामगारांच्या शिकलेल्या मुलांचीच भरती करावी, माथाडी अधिनियमाचा दुरुपयोग केला जात आहे त्यासंदर्भात माथाडी कायदा बचाव कृतीसमितीने दिलेल्या सूचनांनुसार उपाययोजना कराव्यात, शासनाच्या कामगार, पणन विभागाकडून माथाडी, वारणार, मापाडी कामगारांवर अन्याय करणारे जीआर काढले आहेत ते तातडीने मागे घ्यावेत, अशा आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: