व्याख्यानातील महत्त्वाचे मुद्दे
डॉ. पटवर्धन यांनी वनस्पतींच्या नैसर्गिक अधिवासात पक्षी आणि सस्तन प्राण्यांची भूमिका, त्यांचे परस्परसंबंध आणि निसर्ग संतुलनातील त्यांचे महत्त्व सोप्या भाषेत समजावून सांगितले. त्यांनी परागीभवन (Pollination) आणि बीजप्रसार (Seed Dispersal) या प्रक्रियांमध्ये पक्षी व सस्तन प्राणी कशा प्रकारे सहभागी होतात, याबाबत ठोस उदाहरणे देऊन माहिती दिली. तसेच, मानवाने या जैविक संबंधांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी मांडले.
व्याख्यानानंतर उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांनी चर्चेला अधिक समृद्ध केले.
या व्याख्यानमालेतील अंतिम सत्र शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. या सत्रात “वनस्पतींचा रासायनिक संवाद” या विषयावर आयसर पुणेचे संशोधक डॉ. सागर पंडित आणि वनस्पती तज्ज्ञ डॉ. महेश शिंदीकर यांच्यात संवाद होईल.
‘हिरवाई महोत्सवा’चा उद्देश स्थानिक देशी वनस्पतींबद्दल जागरूकता वाढवणे आणि त्यांच्या संवर्धनात जनसहभाग वाढवणे हा आहे. सर्व कार्यक्रम विनामूल्य असून, आयोजक राजीव पंडित आणि वृंदा पंडित यांनी उद्याच्या समारोप सत्रालाही उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
Jeevvidha, Hirwai Festival, Dr. Ankur Patwardhan, Pune Environment, Biodiversity, Plant-Animal Relations, Ecosystem, Environmental Awareness, Pune News, Indradhanushya Paryavaran Kendra
#HirwaiMahotsav #Jeevvidha #PuneEnvironment #AnkurPatwardhan #Biodiversity #Ecosystem #EnvironmentalAwareness #PlantConservation

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: