उरणमधील आरपीआय कार्यकर्त्यांचा 'भारत जिंदाबाद'साठी उत्स्फूर्त प्रतिसाद
उरण: पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मधील भारतीय सैनिकांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आरपीआय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार उरणमध्ये 'भारत जिंदाबाद यात्रा' आयोजित करण्यात आली होती.
आज, २५ मे २०२५ रोजी सकाळी १२ वाजता उरण तालुकाध्यक्ष संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेला सुरुवात झाली. उरणमधील आरपीआय कार्यालयापासून निघालेली ही 'भारत जिंदाबाद यात्रा' डॉ. बाबासाहेब आंबेडकर बालोद्यान, उरण बौद्धवाडा येथे पोहोचली, जिथे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रेची सांगता झाली.
यावेळी आरपीआय उरण तालुकाध्यक्ष संजय गायकवाड, शिवसेनेचे सुलेमान शेख, आरपीआय उरण उपाध्यक्ष खालीक शेख, तालुका युवक अध्यक्ष सुयोग गायकवाड, सचिव सुनील कोल्हे, शहर अध्यक्ष सूर्यकांत शिंदे, सहसचिव देवेंद्र कोळी, चारफाटा येथील शैलेश मूलके, बौद्धवाडा येथील कुणाल जाधव, विशाल कवडे, प्रज्वल वाघमारे, मांगीरा येथील लाल नूर शेख, नरेश बॅगर, प्रकाश पिल्ले, प्रकाश गुलद, संजय गायकवाड, दत्ता गायकवाड, अतुल पुंदीर, प्रशांत भागा, भवरा येथील रमेश कातकरी, प्रकाश धसाडे, गौतम कांबळे, सिद्धार्थनगर येथील जयभीम झळकी, धुळप्पा, डाऊरनगर येथील आज्ञाराम यादव आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणांनी उरण शहर दुमदुमले होते. या यात्रेमुळे भारतीय सैनिकांच्या शौर्याला उजाळा मिळाला आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली, असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
---------------------------------------------------------------------------
#Uran #RPI #BharatZindabadYatra #IndianArmy #OperationSindoor #Patriotism #Maharashtra #PoliticalEvent #JaiHind #VandeMataram

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: