उरण: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी रवींद्र हरिश्चंद्र चव्हाण (महाड) यांची एकमताने निवड झाली आहे. या निवडीमुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
रवींद्र चव्हाण यांनी पक्षासाठी केलेले कार्य, कार्यकर्त्यांचे संघटन, आणि पक्षाची ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार आणि खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोकण विभागीय अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ही निवड झाली.
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संतोष घरत, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आदिती नलावडे आणि रायगड जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रवींद्र चव्हाण यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
संतोष घरत यांनीही रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन केले. रवींद्र चव्हाण हे संतोष घरत यांचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यांच्या निवडीत संतोष घरत यांचा मोठा वाटा आहे.
रवींद्र चव्हाण यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. सोशल मीडियावरही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, सामाजिक संस्था आणि संघटनांच्या सदस्यांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले आहे.
---------------------------------------------------------------------------------
#Maharashtra #Raigad #NCP #Politics #Appointment #RavindraChavan #SharadPawar #जीतेंद्रआव्हाड #जयंतपाटील

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: