महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार - रिजिजू

 


काँग्रेसने धर्म-जातीचे राजकारण केले - रिजिजू

 पुणे : "देशाच्या स्वातंत्र्यानंतर प्रथमच मोदी सरकारने 'संविधान दिवस' सुरू केला. काँग्रेसने ७५ वर्षे मुस्लिम समाजाला केवळ व्होट बँक म्हणून वापरले," असा आरोप संसदीय कार्यमंत्री डॉ. किरण रिजिजू यांनी केला.

पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, "राहुल गांधी प्रगल्भ नेते म्हणून कधीच उदयास आले नाहीत. अमेरिकेत जाऊन देशाला शिव्या देऊन नेता होता येत नाही. काँग्रेससाठी एक परिवार महत्त्वाचा असला तरी आमच्यासाठी देश प्रथम आहे."

महाराष्ट्रातील निवडणुकांबाबत बोलताना त्यांनी महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त केला. मुंबईच्या विकासाचा उल्लेख करत समृद्धी महामार्ग, पूल, बोगदे यांमुळे शहराचा चेहरामोहरा बदलल्याचे सांगितले.

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० बाबत बोलताना ते म्हणाले, "हे कलम पुन्हा लागू होणार नाही. आता तेथील मागासवर्गीय नागरिकांना आरक्षणाचा लाभ मिळत आहे."

भाजप पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले, निवेदिता एकबोटे , अतुल सावे, मिलिंद कांबळे  यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार - रिजिजू महाराष्ट्रात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार - रिजिजू Reviewed by ANN news network on ११/०९/२०२४ ०६:२४:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".