नवी दिल्ली: बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या हल्ल्यांविषयी राहुल गांधींनी अद्याप कोणतेही वक्तव्य केले नसल्यामुळे त्यांच्यावर आणि काँग्रेसवर गंभीर टीका होत आहे. विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी या विषयावर भाष्य करणे अपेक्षित होते, मात्र त्यांनी यावर मौन पाळले आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधींनी नुकतेच बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतलेल्या मोहम्मद युनूस यांचे अभिनंदन केले, परंतु हिंदूंवरील अत्याचारांवर काहीच प्रतिक्रिया दिली नाही. केवळ 'शांती आणि स्थैर्य परत यावे' अशी इच्छा व्यक्त केली आहे.
काँग्रेस पक्षाने जागतिक संघर्षांवर आणि त्यांच्या बळींवर टिप्पणी करण्यास कधीही मागेपुढे पाहिलेले नाही. अलीकडेच, प्रियांका गांधी यांनी गाझामधील इस्रायलच्या हल्ल्यांवर तीव्र निषेध व्यक्त केला होता, तर राहुल गांधींनी इस्रायलच्या हवाई हल्ल्यांना "मानवतेविरुद्धचे अपराध" असे संबोधले होते. परंतु, त्यांनी हल्लेखोर हमासचा उल्लेख केला असला तरी त्यांना त्यांना 'दहशतवादी संघटना' म्हटले नाही.त्यामुळे असे म्हटले जात आहे की, जेव्हा अन्यधर्मीय अत्याचार करणारे असतात आणि हिंदू बळी ठरतात, तेव्हा काँग्रेस पक्ष मुद्दाम शांत राहतो.
याच कारणामुळे काँग्रेसने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (CAA) विरोध केला आहे असेही म्हटले जात आहे. या उलट काँग्रेसपक्षाने असा दावा केला आहे की हा कायदा मुस्लिमांना 'दुसऱ्या स्थानावर' ठेवतो.
असे म्हटले जात आहे की, बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल बोलणे काँग्रेससाठी कष्टदायक ठरू शकते, कारण त्याने भारतात मुस्लिम समाज पीडित आहे या नरेटीव्हला छेद दिला जाईल. काँग्रेसला या विषयावर सत्याला धरून बोलणे परवडणारे नाही. त्यामुळे त्यांच्या मतदारांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊ शकते. राहुल गांधींच्या या भूमिकेने काँग्रेसच्या नेतृत्वाची सत्यता आणि त्यांच्या हिंदूंच्या प्रश्नांवरील भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Reviewed by ANN news network
on
८/१३/२०२४ १२:२०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: