पिंपरीतील बैठकीत झाला एकमुखी निर्णय
पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात हजारो उमेदवार उभे करण्याचा निर्णय १० मार्च रोजी पिंपरी येथे झालेल्या मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पिंपरी चिंचवड शहरात व पुणे जिल्ह्यात येणाऱ्या सर्व मंत्र्यांना घेराव घालून जाब विचारण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला मारुती भापकर, मनोहर वाडेकर, प्रकाश जाधव, सतीश काळे, जीवन बोराडे, धनाजी येळकर, नकुल भोईर, वैभव जाधव, वसंत पाटील, संजय जाधव, अभिषेक म्हसे, सचिन पवार, शिवाजी पाडुळे, गणेश देवराम, ब्रह्मानंद जाधव, अमोल ढोरे, भाऊसाहेब ढोरे, सतीश शेलार, संदीप नवसुपे, ओंकार देशमुख, मोहन पवार, राज साळुंखे,स्वप्नील परांडे आदी उपस्थित होते.
मनोज जरांगे पाटील यांना नवी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने सगेसोयरे बाबतची अधिसूचना काढून आंदोलन स्थगित करावयास लावले. त्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्याचे वचन लाखो मराठा आंदोलकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले 16 फेब्रुवारी पर्यंत यावर हरकती मागवण्यात आल्या. त्याची मुदत संपून तीन आठवडे झाले, तरी महाराष्ट्र सरकारने सदर सगेसोयरे बाबतच्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर केले नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी येत्या चार दिवसात सदर अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे अन्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात कमीत कमी एक हजार उमेदवार उभे करून मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात आजवर गप्प बसलेल्या पंतप्रधानांचे लक्ष वेधणार असल्याचे या बैठकीत सर्वानुमते जाहीर करण्यात आले.
ज्यांना उमेदवारी अर्ज भरण्याची इच्छा आहे त्या व्यक्तींनी शिरूर लोकसभेसाठी मनोहर वाडेकर, आतिश मांजरे, जीवन बोराडे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सतीश शेलार, अमोल ढोरे, भाऊसाहेब ढोरे, मारुती भापकर, प्रकाश जाधव, धनाजी येळकर, शिवाजी पाडुळे, सतीश काळे, गणेश देवराम, अभिषेक म्हसे, सचिन पवार, नकुल भोईर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा