पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेने स्मार्टसिटीच्या नावाखाली शेकडो कोटी रुपये खर्चून बांधलेल्या अनेक रस्त्यांवर पाणी साठत आहे. खड्डे पडले आहेत. रस्तेबांधणी सदोष असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे रविराज काळे यांनी केला असून दोन दिवसात शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत अन्यथा या खड्ड्यात वृक्षारोपण करू असा इशारा काळे यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात शेकडो कोटी रुपये खर्च करून स्मार्ट सिटीचे स्वप्न आम्हाला पिंपरी चिंचवडकरांना दाखवण्यात आले. परंतु सध्या शहरात खासकरून पिंपळे निलख, विशालनगर,रक्षक चौक,कस्पटे वस्ती या परिसरात जागोजागी पाणी साचलेले दिसते.स्मार्ट सिटीचे कामाच्या नावाखाली अनेक ठिकाणी रस्ते खोदाई करून ठेवण्यात आली आहे.त्याच जागी अनेक मोठमोठे खड्डे पडलेले दिसतात.हा प्रकार वेळोवेळी ड प्रभागातील जनसंवाद माध्यमातून मांडण्यात आला परंतु प्रशासक असल्याने या अधिकाऱ्यांवर कोणाचाही वचक राहिला नाही.त्यामुळे विविध ठिकाणी पाणी साचण्यास कारणीभूत असणाऱ्या ठेकेदारांना नेमके शहरातील रस्त्यांवर पाणी साचवण्याचे काम दिले होते की रस्ते स्मार्ट करण्याचे काम दिले होते याची चौकशी मनपा आयुक्त शेखर सिंह यांनी करावी.
आज आम्ही आम आदमी पार्टी म्हणून शहरात साचलेल्या पाण्यामध्ये होड्या सोडून निषेध व्यक्त केला आहे आणि येत्या दोन दिवसांत शहरातील खड्डे बुचवण्यात आले नाही तर खेड्यांमध्ये झाडे लावू. अन्यथा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नावाने या खड्ड्यांचे नामकरण करू.
Reviewed by ANN news network
on
७/२३/२०२३ ०३:५०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: