रत्नागिरी : प्रादेशिक मनोरुग्णालयात येणारे रुग्ण हे त्यांच्या शारीरिक, मानसिक स्थितीमुळे भरती झालेले असतात . या रुग्णांची अवहेलना होवू नये .डॉक्टरांनी त्यांना प्रयत्नपूर्वक घरगुती वातावरणाचा अनुभव द्यावा अशी अपेक्षा पालकमंत्री उदय सामंत यांनी केली .
जिल्हा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.एस .एम. कलगुटकी,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओठणकर आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, या रुग्णालयाचा दुरुस्ती तसेच सुधारणा विषयक कामांकरीता 20 कोटी रुपयांची आवश्यकता आहे . या बाबतचा प्रस्ताव मंत्रालयालय स्तरावर पाठवावा .त्याचा आपण पाठपुरावा करू अशी ग्वाही देऊन या मेंटल हॉस्पिटल मध्ये 161 रुग्ण भरती असून त्यांच्याकरीता उद्यापासून सकाळच्या न्याहरीमध्ये दूधाचा समावेश करण्यात यावा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले .
या रुग्णालयाच्या सुधारणा करीता जिल्हा नियोजनमधून सुमारे एक कोटी 80 लाख रुपये मिळाल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक कलगुटकी यांनी दिली .
त्यानंतर पालकमंत्र्यांनी शासकीय रुग्णालयाला भेट देऊन तेथील मंजूर व पेडिंग वैद्यकीय बिलांचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी वैद्यकीय रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक श्रीमती डॉ.संघमित्रा फुले उपस्थित होते .
आज दिवसभराच्या मॅरेथॉन दौऱ्यात पालकमंत्र्यांनी वैदयकीय महाविदयालय (माहिला रुग्णालय ) , प्रादेशिक मनोरुग्णालय तसेच सिव्हिल हॉस्पिटल येथील इमारत पाहणी करून या सर्वांचा आढावा घेतला .
Reviewed by ANN news network
on
७/०९/२०२३ १०:३७:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: