शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा: पालकमंत्री उदय सामंत

 

रत्नागिरी: बँकेचे शाखाधिकारी शेतकऱ्यांकडे कर्जासाठी सिबिल स्कोअरची (CIBIL Score) मागणी करत असतील, तर अशा शाखाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे (Criminal Charges) दाखल करण्याचे सक्त निर्देश रत्नागिरीचे पालकमंत्री  उदय सामंत यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या अडीअडचणींसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, प्रांताधिकारी जीवन देसाई उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी एकत्रित बैठक

यावेळी बोलताना सामंत यांनी, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना आणि आंबा बागायतदारांना भरपाई मिळवून देण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांच्यासह एकत्रित बैठक घेतली जाईल आणि त्या बैठकीला सहकारमंत्र्यांनाही निमंत्रित केले जाईल, असे आश्वासन दिले. शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करण्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.


 Uday Samant, Ratnagiri, Farmers Loan, CIBIL Score, Bank Officials, Criminal Charges, Mango Growers, Unseasonal Rains, Compensation, Ajit Pawar

 #UdaySamant #Ratnagiri #FarmersRights #CIBILScore #BankLoans #AgriculturalLoans #MangoGrowers #CropLoss #MaharashtraGovernment #AjitPawar

शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा: पालकमंत्री उदय सामंत शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअर मागणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा: पालकमंत्री उदय सामंत Reviewed by ANN news network on ६/२९/२०२५ ०८:४२:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".