पुणे, प्रतिनिधी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने मागील ११ वर्षांत १९८४ नंतर निर्माण झालेली राजकीय अस्थिरता संपुष्टात आणली असून , या काळात कोणत्याही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, ही एक महत्त्वाची बाब असल्याचे मत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात व्यक्त केले. 'सेवा सुशासन आणि गरीब कल्याणचे ११ वर्ष' या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जावडेकर म्हणाले की,
मोदी सरकार 'सबका
साथ, सबका विकास'
या तत्त्वानुसार २४
तास, २४/७
काम करत आहे.
काँग्रेसच्या कार्यकाळात मंत्र्यांवर रोज
भ्रष्टाचाराचे
आरोप होत होते
आणि त्यांना राजीनामे द्यावे
लागत होते, मात्र
मोदी सरकारच्या काळात
असे घडले नाही.
पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारच्या विविध
क्षेत्रांतील कामगिरीचा आढावा घेतला. जावडेकर यांच्या मते, भाजपने जगातील
आपली प्रतिमा उंचावली असून
, परदेशातील भारतीय
नागरिकांना आता गौरवाची भावना
येत आहे. भारत जगातील चौथ्या
क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे , आणि देशातील ३०
कोटी गरीब लोक
गरिबी रेषेच्या वर
आले असल्याची दखल
संयुक्त राष्ट्रसंघाने
घेतली आहे. केंद्र सरकारने गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा
केला आहे , आणि देशाची सुरक्षा पूर्वीपेक्षा अधिक
मजबूत झाली आहे.
संरक्षण क्षेत्रातील पारदर्शकतेवर भर
देताना जावडेकर यांनी
सांगितले की, पूर्वी काँग्रेसच्या काळात
संरक्षण खरेदीत दलालांचा हस्तक्षेप आणि
भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर होता
, जो आता
मोदी सरकारने बंद
केला आहे. संरक्षण सामुग्री व्यवहारात पूर्ण पारदर्शकता आली
असून , पुण्यासारख्या शहरांमध्ये पाच
हजार कंपन्या संरक्षण क्षेत्रात कार्यरत झाल्या
आहेत. तोट्यात असलेल्या संरक्षण क्षेत्रातील कंपन्या आता
आर्थिकदृष्ट्या
भरभराटीस आल्याचेही त्यांनी नमूद केले.
देशाच्या सुरक्षिततेबाबत बोलताना त्यांनी सर्जिकल स्ट्राईक आणि 'ऑपरेशन सिंदूर'
(यामध्ये पाकिस्तानात घुसून
दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केल्याचा उल्लेख)
यांचा उल्लेख केला.
पाकिस्तानच्या ड्रोन
हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिले
गेले असून , युद्धाचे स्वरूप बदलले असले
तरी भारत त्यात
तरबेज असल्याचे दाखवून
दिले आहे. मोदी सरकार सत्तेत
आल्यापासून देशातील बॉम्बस्फोट थांबले असून , हे कायदा आणि
सुव्यवस्थेच्या
चांगल्या स्थितीचे लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. नक्षलवाद संपुष्टात आणण्याचे प्रयत्न सुरू असून , पुढील वर्षी तो
फक्त दोन जिल्ह्यांपुरता मर्यादित राहील
असा विश्वास त्यांनी व्यक्त
केला.
जम्मू-काश्मीरमध्ये रोजगार,
नवीन संधी आणि
पर्यटन वाढवून निर्माण केल्याचेही जावडेकर यांनी
सांगितले. पायाभूत सुविधांबाबत ते
म्हणाले की, पूर्वी चार
शहरांमध्ये मेट्रो होती, पण
आता देशात २३
शहरांमध्ये मेट्रो आहे , १४२ वंदे भारत
रेल्वे सुरू झाल्या
आहेत , आणि ७०
हजार किलोमीटर नवीन
महामार्ग बांधले गेले आहेत.
डिजिटल क्रांतीमुळे रोज
६० कोटी आर्थिक
व्यवहार होत असून , देशात १३० कोटी
मोबाईल वापरकर्ते, १४०
कोटी आधारकार्डधारक, आणि
९७ कोटी इंटरनेट धारक
झाले आहेत. दहा टक्के EWS आरक्षण,
रेल्वे स्थानकांवरील स्वच्छता, आणि
छोट्या स्थानकांवर प्रवासी सुविधांची निर्मिती यावरही
त्यांनी प्रकाश टाकला.
शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने उचललेल्या पावलांची माहिती
देताना जावडेकर म्हणाले की,
स्वातंत्र्यानंतर
प्रथमच प्रत्येक शेतकऱ्याला ३८
हजार रुपये थेट
बँक खात्यात मिळाले
आहेत. काँग्रेसच्या काळात
शेतकऱ्यांना आठ लाख कोटी
रुपयांची कर्जमाफी दिली गेली, तर
एनडीए सरकारने ३०
लाख कोटी रुपयांची कर्जमाफी दिली
असल्याचे त्यांचे म्हणणे होते. सर्व
सरकारी बँका फायद्यात आल्या
असून, कुंभमेळ्यात ६३
कोटी लोक शिस्तीने नियोजनबद्धरित्या सहभागी
झाले, ही बाब
देखील त्यांनी अधोरेखित केली.
यावेळी पुणे
भाजप शहराध्यक्ष धीरज
घाटे, राज्य प्रवक्ते संदीप
खर्डेकर, पुणे सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, पुनीत
जोशी, पश्चिम महाराष्ट्र प्रचार
आणि प्रसिद्धी प्रमुख
अमोल कविटकर, हेमंत
लेले उपस्थित होते.
---------------------------------------------------------------------------------------------------------------Narendra Modi, Prakash Javadekar, NDA Government, India, Politics, Governance, Anti-Corruption, Economic Growth, Defence, Digital India, Pune, BJP
#NarendraModi #PrakashJavadekar #ModiGovt11Years #AntiCorruption #GoodGovernance #DigitalIndia #IndianEconomy #PunePolitics #BJP

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: