पाकिस्तानला 2025 आणि 2026साठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची अस्थायी सदस्यता मिळाली आहे. जापानच्या जागेवर पाकिस्तान बसला आहे. या दोन वर्षांत पाकिस्तानला आतंकवाद, प्रतिबंध, क्षेत्रीय वाद आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्याची संधी मिळणार आहे.
पाकिस्तान ही सदस्यता आतापर्यंत सात वेळा घेतली आहे. तर भारत आठ वेळा अस्थायी सदस्य राहिला असून जगातील सर्वाधिक अस्थायी सदस्यता असलेल्या देशांमध्ये चौथ्या स्थानी आहे. तरीही भारताला स्थायी सदस्यत्व मिळत नाही, कारण चीन भारताच्या स्थायी सदस्यत्वाला विरोध करत आहे. चीनचा विरोध मागे पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट दिसते.
पाकिस्तानच्या सदस्यत्वामुळे भारताला चिंता वाढली आहे. काश्मीरचा मुद्दा पुन्हा एकदा सुरक्षा परिषदेत उपस्थित केला जाऊ शकतो. तसेच आतंकवादावरील प्रतिबंधांवर पाकिस्तानचा प्रभाव पडू शकतो. पाकिस्तान अलकायदा, ISIS यांसारख्या आतंकी संघटनांवरील प्रतिबंध टाळण्याचा प्रयत्न करू शकतो.
भारतने आपल्या सदस्यत्वाचा काळात आतंकवाद आणि सुरक्षा सुधारणांवर भर दिला होता. मात्र पाकिस्तानच्या स्थानामुळे आता भारताच्या हितांवर परिणाम होऊ शकतो. भारताला आता आपल्या राजकीय आणि कूटनीतिक धोरणांमध्ये अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे.
-----------------------------------
#UNSC
#PakistanAtUN
#IndiaVsPakistan
#TerrorismSupport
#KashmirDebate
Reviewed by ANN news network
on
५/१६/२०२५ ०४:१०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: