गुरुवार, २२ मे, २०२५

महाराष्ट्र पोलिस दलात मोठे फेरबदल; २१ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

 


मुंबई, २२ मे २०२५: महाराष्ट्र पोलिस दलात आज मोठा फेरबदल करण्यात आला असून, राज्य शासनाने २१ वरिष्ठ भारतीय पोलिस सेवा (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. गृह विभागाने यासंदर्भातील शासन आदेश अधिकृतपणे जारी केला आहे. कायदा आणि सुव्यवस्था अधिक परिणामकारकरित्या राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

या बदल्यांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, रायगड, लातूर, सातारा, सिंधुदुर्ग, बुलढाणा, अमरावती, गडचिरोली अशा विविध जिल्ह्यांचा समावेश आहे. बदल्या मुख्यतः प्रशासकीय कारणास्तव व कायदा-सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

बदल्यांची यादी

  • राकेश ओला: अहिल्यानगर (अहमदनगर) येथील पोलिस अधीक्षक पदावरून बृहन्मुंबई येथे पोलिस उप आयुक्तपदी नियुक्त.

  • सोमनाथ घागे: रायगड येथून अहिल्यानगर येथे पोलिस अधीक्षक म्हणून बदली.

  • आंचल दलाल: पुणे येथील राज्य राखीव पोलिस बलातून रायगड येथे पोलिस अधीक्षकपदी.

  • महेंद्र पंडित: कोल्हापूर येथून ठाणे शहरात पोलिस उप आयुक्तपदी.

  • योगेश कुमार गुप्ता: नांदेड येथून कोल्हापूर पोलिस अधीक्षकपदी.

  • बच्चन सिंह: अकोलाहून नागपूर राज्य राखीव पोलिस बल गट क्र. ४ चे समादेशक.

  • अर्चित चांडक: नागपूरहून अकोला येथे पोलिस अधीक्षक म्हणून.

  • मंगेश शिंदे: आर्थिक गुन्हे शाखा, मुंबईहून नागपूर लोहमार्गचे पोलिस अधीक्षकपदी.

  • राजतिलक रोशन: AIG (कायदा व सुव्यवस्था), मुंबईहून बृहन्मुंबईत उप आयुक्तपदी.

  • बाळासाहेब पाटील: पालघरहून नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षकपदी.

  • यतीश देशमुख: गडचिरोली अभियान विभागातून पालघर पोलिस अधीक्षक.

  • सौरभ अग्रवाल: सिंधुदुर्गहून पुणे गुन्हे शाखेत पोलिस अधीक्षक.

  • मोहन दहिकर: ठाणे शहरातून सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक.

  • विश्व पानसरे: बुलढाणा ते अमरावती राज्य राखीव बल गट क्र. ९ समादेशक.

  • निलेश तांबे: नागपूर गुन्हे शाखेतून बुलढाणा पोलिस अधीक्षक.

  • समीर अस्लम शेख: साताराहून बृहन्मुंबई उप आयुक्तपदी.

  • तुषार दोषी: पुणे लोहमार्गहून सातारा पोलिस अधीक्षक.

  • सोमय विनायक मुंडे: लातूरहून छत्रपती संभाजीनगर परिमंडळ १ मध्ये डीसीपी.

  • जयंत मीणा: पुणे एटीएसहून लातूर पोलिस अधीक्षकपदी.

  • निती बगाटे: संभाजीनगर शहरातून रत्नागिरी पोलिस अधीक्षक.

  • रितू खोकर: सांगलीहून वाराशिव पोलिस अधीक्षक.

संजय वाय. जाधव यांचीही बदली करण्यात आली आहे, मात्र त्यांच्या नवीन पदस्थापनेबाबतचा आदेश लवकरच स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

या बदल्या महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ मधील कलम २२ (न) अन्वये व आस्थापना मंडळ क्रमांक १ च्या शिफारशीनुसार करण्यात आल्या आहेत. गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या स्वाक्षरीने आणि राज्यपालांच्या नावाने या आदेशावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.


#MaharashtraPolice #PoliceTransfer #IPS #MaharashtraGovernment #LawAndOrder #Maharashtra

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा