दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३५२ उमेदवारांचे ४७७ अर्ज दाखल


मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुक २०२४ च्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान २६ एप्रिल २०२४ रोजी होणार आहे. यासाठी मराठवाडा व विदर्भातील मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज सायंकाळपर्यंत  एकूण ३५२ उमेदवारांचे ४७७ अर्ज दाखल झाले आहेत.

दुसऱ्या टप्प्यातील एकूण ८ लोकसभा मतदारसंघांमध्ये २६ एप्रिल २०२४ रोजी मतदान होणार असून यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघाचा सामावेश आहे.

आज दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुलढाणा २९ उमेदवारांचे ४२ अर्ज, अकोला २८ उमेदवारांचे ४०, अमरावती ५९ उमेदवारांचे ७३, वर्धा २७ उमेदवारांचे ३८, यवतमाळ- वाशिम ३८ उमेदवारांचे ४९, हिंगोली ५५ उमेदवारांचे ७८, नांदेड ७४ उमेदवारांचे ९२ आणि परभणी ४२ उमेदवारांचे ६५ अर्ज दाखल झाले आहेत.


दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३५२ उमेदवारांचे ४७७ अर्ज दाखल  दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३५२ उमेदवारांचे ४७७ अर्ज दाखल Reviewed by ANN news network on ४/०५/२०२४ ०९:३५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".